Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
हातातोंडाशी गाठ असलेल्या पण एका अनामिक धाग्यात बांधलेल्या एका एकत्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एखादा चमत्कार व्हावा तशी बदलते तेव्हा, अनेक जुनीनवी गृहीतं मागे पडतात. इच्छा आणि नाती बदलतात, एक विवाह मोडतो, आणि विनाशक शेवटाकडे जाणारा तणाव निर्माण होतो, जो थोपवणं अशक्य असतं. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय सुरक्षित घरात जाणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून सांपत्तिक प्रगतीकडे डोळे लावून बसलेल्या समाजाचं आतलं चित्र, विख्यात कन्नड लेखक विवेक शानभाग यांच्या बदलांचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीतून स्पष्ट होतं. या कुटुंबाचं विश्वच घाचरगोचर होऊन जातं. इतरांसाठी हा शब्द निरर्थक असला तरी, या कादंबरीच्या अस्वस्थ, निनावी सूत्रधारासाठी ते दुरुस्त करण्यापलिकडचं काहीतरी होऊन जातं. स्पष्ट, वाचत राहावी अशी शैली, त्यासोबतच नर्मविनोदाची पखरण, आणि माणसांमधला ओलावा असलेली ही घाचरगोचर नावाची गोष्ट. सध्याच्या भारतात श्रीमंत होण्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम यांचे बदलते संदर्भ उलगडून दाखवते. आधुनिक जगण्याच्या या कहाणीचे पडसाद इतरत्रही जाणवतात.