Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
“एक भाकर तीन चुली”
नाळ तोडायच्या आधीपासून ते चीतेपर्यंत, बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जातीधर्माच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन माझ्या प्रिय आईला हि कादंबरी समर्पित करीत आहे.
२०१७ साली सुरु झालेली शरीर व मनाचीही प्रचंड दमवणूक करणारी हि लेखनप्रक्रिया आत्ताशी संपलीय. मागं वळून पाहताना आज थोडा जरी हा लेखनप्रवास आठवला तरी जे काही लिहिलंय त्याबद्दल समाधान वाटू लागतं. कारण बाह्यजगतातले सगळे दैनंदिन व्यवहार पार पाडून, नोकरी करून, आरोग्य सांभाळून, आर्थिक अडचणीवर मात करून हे सगळं लिहिण्यासाठी मनस्थिती तयार करत वेळ काढणं खरं तर फार जिकिरीचं काम होतं पण जे काही मनात साचलं होतं, जे अनेक वर्षे खदखदत होतं ते सगळं जगासमोर आणलंच पाहिजे हा माझा ठाम निर्धार होता म्हणून तर हि कादंबरी पूर्णत्वास नेता आली.
Share
