Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 491.00
Regular price Rs. 545.00 Sale price Rs. 491.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Condition
`चाणक्याचा मंत्र`. चाणक्य कोण हे सर्व भारतीयांस चांगलेच ठाऊक आहे. इसवीसन पूर्व ३४०. परिस्थितीने होरपळलेला पण ध्येयाने झपाटलेला एक ब्राह्मण युवक आपल्या परमप्रिय पित्याच्या निर्घृण हत्येचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो. थंड डोक्याचा, कावेबाज, कठोर व प्रचलित नीतिमूल्यांना न जुमानणारा तो युवक, भारतातील सर्वश्रेष्ठ रणनीतिकार बनतो. अलेक्झांडरच्या आक्रमणाविरुद्ध विस्कळीत झालेल्या भारताला एकसंघ बनवण्यात यशस्वी होतो. चंद्रगुप्ताला विशाल मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान करतो. आजच्या काळात म्हणजे अडीच सहस्राद्बीनंतर चाणक्य पुन्हा गंगासागर मिश्राच्या रूपात अवतार घेतो. भारतातील एका छोट्या शहरात, व्यवसायाने शिक्षक असणारा गंगासागर अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या हातातील कठपुतळ्या बनवतो.आधुनिक भारत हा प्राचीन भारतासारखाच वर्णभेद, भ्रष्टाचार आणि समाज विभाजक राजकारण ह्यांनी दुंभगलेला आहे. हा कावेबाज पंडित, भारताला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा चमत्कार करू शकेल का? याचे उत्तर मिळवण्यासाठी अश्विन सांघी या सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या या लेखकाचे `चाणक्याचा मंत्र` हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
View full details