Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 215.00
Regular price Rs. 240.00 Sale price Rs. 215.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

नव्वदीनंतरचे जागतिक बदल - गावातील माणुसकीला आलेली मरणकळा - याचं वास्तव दर्शन या पुस्तकातील सकस कथांमधून नेटकेपणाने मांडलेले आहे. शेती, माती, नाती, नीती, संस्कृती, अस्सल ग्रामीण जीवनाच्या जाणिवा - पैसा, संस्कार, परिस्थिती यांचा भुलभुलैया – कोणी अडकतो तर कोणी सुटतो - आयुष्यभर कणाकणाने जीवन जाळत आलेल्या असंख्य ‘मीं’च्या भावभावनांच्या हळव्या कथा – धनाच्या हव्यासापोटी सत् मार्ग हरवून गैर मार्गाला जात घरादाराला वेशीवर टांगणारी पिढी - भावनांचे चढ-उतार – स्वाभिमानापुढे पोटातील उसळलेल्या भुकेने दाखवलेले वास्तव - आता प्रश्न हा की, हे सगळं शहरात होतंय का? तर नाही, शहराची व बदलाची हवा लागलेल्या गावागावात घडतंय... गावपण संपून शहरीकरणाकडे वाटचाल करणारं एक गाव, बारा बलुतेदारांचा वारसा लाभलेलं एक गाव – आपलेपणा विसरून परकं होत जाताना ज्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्या भावविश्वाची कहाणी `अबीरमाती..!’

View full details